Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही – मुख्यमंत्री

Admin by Admin
March 23, 2025
in महाराष्ट्र
0
नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही – मुख्यमंत्री
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर , 23 मार्च (हिं.स.)।नागपूर हिंसाचारात एका महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयभंग झाला नसल्याचा खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या खुलाशामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक करत जाळपोळ केली होती. ज्यात अनेक पोलिस जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच येथे दंगलखोरांनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आता त्या दंगलीत महिला पोलिसाचा विनयभंग झालाच नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करताना, महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही. तिच्यावर दगडफेक झाली. विनयभंगाच्या बातम्या चुकीच्या आहेत. विनयभंग झाला नसल्याची माहिती पोलिस आयुक्तांनीच आपल्याला दिली असल्याचे फडणवीसांनी म्हटलं आहे.

या दंगलीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सरकारला घेरलं जातयं. आताच दंगली कशा उसळतात, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी यावरून सरकारवर निशाणा साधलाय. सत्ताधारी वातावरण दुषित करताहेत. पोलीस सत्ताधा-यांच्या दबावात आहेत, असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूर शहरात लावण्यात आलेली संचारबंदी सलग पाचव्या दिवशीही कायम आहे.. शहरातील 9 विभागातील संचारबंदी अद्यापही कायम असून दोन विभागातील संचारबंदी हटवण्यात आलीये.. गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली,शांतीनगर,सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे सामान्य जनजीवनावर परिणाम होतोय.

Previous Post

शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शहिदांना अभिवादन

Next Post

आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली ठरला एकमेव फलंदाज

Admin

Admin

Next Post
आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली ठरला एकमेव फलंदाज

आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली ठरला एकमेव फलंदाज

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group