“जळगाव जिल्ह्यावर पुन्हा संकटाची सावट! वादळी पावसाचा अलर्ट; पशुधनधारकांनी हे ‘8 उपाय’ त्वरित करा!”
जळगाव | प्रतिनिधी:
जळगाव जिल्ह्याला मागील दोन दिवसांत वादळी वाऱ्यांसह झालेल्या बेमोसमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आणि आता पुन्हा एकदा जिल्ह्यावर निसर्गाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यातही वादळी वारे आणि पावसाची शक्यता असून, जिल्हा प्रशासनाने पशुधनधारकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
ठळक सूचना व उपाय (पशुधनधारकांसाठी MUST READ):
- जनावरांसाठी सुरक्षित निवारा ठेवावा:
गोठ्यांना पावसापासून आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे उपाय करावेत. - मोकळ्या जागेत जनावरे बांधू नका:
झाडाखाली किंवा उघड्यावर बांधल्यास धोका वाढू शकतो. - धोकादायक झाडांची छाटणी करावी:
मोडकळीला आलेल्या झाडांमुळे जनावरांवर धोका निर्माण होऊ शकतो. - जनावरे पाणथळ जागेत नेऊ नका:
नदीपात्र, खड्डे किंवा साचलेले पाणी टाळा. - विजेच्या खांबांपासून दूर ठेवा:
ओल्या जागी डी.पी. किंवा वायरजवळ जनावरे ठेवू नका. - गोठ्यांची विद्युत सुरक्षा तपासा:
शॉर्टसर्किटची शक्यता कमी करा. - अन्न-पाण्याची व्यवस्था ठेवा:
पुरेसे व स्वच्छ अन्न व पाणी जनावरांना द्या. आजारी जनावरांवर तत्काळ उपचार करावेत. - मृत जनावरांची योग्य विल्हेवाट:
नद्यांत मृत जनावरे टाकू नयेत. शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत गाडून टाका.
पोल्ट्रीपालकांसाठी खास सूचना:
- पक्षीगृहात पावसाचे पाणी जाऊ देऊ नये.
- आर्द्रता नियंत्रणात ठेवा.
- ओले खाद्य वापरू नका – बुरशीमुळे पक्षी आजारी पडू शकतात.
- आजारी किंवा मृत पक्ष्यांवर त्वरित कार्यवाही करा.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
“पशुधनधारक व पोल्ट्री व्यावसायिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. वेळेवर काळजी घेतल्यास मोठ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकतो.”