धुळे, 28 मार्च (हिं.स.) उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गावंडे यांनी केले आहे.
सामान्य नागरीकांसाठी
हे करा
तुम्हाला तहान लागली नसली तरीही, जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.
प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
ओरल रीहाड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) वापरा किंवा लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेय घ्यावे.
टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
तुमचे डोके झाकून ठेवा, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारकि साधनांचा वापर करावा.
उन्हात बाहेर जातांचा बुट किंवा चप्पल घालावेत.
रेडिओ, टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्रे वाचावीत.
भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटhttps://mausam.imd.gov.in/वर हवामानाविषयी अद्ययावत माहिती घेत राहावी.
हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालावा.
थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा – दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे, विशेषत: तुमच्या घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला, थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.
जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी.
दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या नागरीकांसाठी
कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरीही काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो त्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.
लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, ज्यांना मानसिक आजारपण असेल अशी व्यक्ती, शारीरिकदृष्टया आजारी, विशेषत: ह्दयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्यांनी काळजी घ्यावी.
थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाश्यांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा. जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
इतर खबरदारी
एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरिक्षण केले पाहिजे.
तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा.
दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा.
शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा.
पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.
हे करु नका
उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषत:दुपारी 12.00 ते 3.00
दुपारच्या वेळी बाहेर असतांना कठोर परिश्रम टाळा.
अनवाणी बाहेर जाऊ नका.
अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
अल्कोहोल, चहा ,कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठया प्रमाणात साखर असलेले पेय टाळा. कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात.
उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका, वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते.
उष्माघात झालेल्या व्यक्तीस तत्काळ ओल्या कपड्याने पुसून शरीराचे तापमान कमी करावे. मदतीसाठी 108, 102 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. रुग्णाला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे यांनी केले आहे.