Saturday, May 10, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज – सुनील उमाप

Admin by Admin
March 15, 2025
in महाराष्ट्र
0
सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज – सुनील उमाप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहिल्यानगर दि. 15 मार्च (हिं.स.) :- नगर शहरासह ग्रामीण भागात युवक-युवतींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत चाललेले व्यसन रोखण्यासाठी काळजापार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित व्यसनमुक्ती समुपदेश केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. निरोगी व सक्षम निर्व्यसनी समाज घडविण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची चळवळ चालविण्यात येणार आहे.सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा ध्यक्ष सुनील उमाप यांनी केले.

पारगाव मौला (तालुका नगर) येथे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील उमाप यांच्या हस्ते या व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कविता नेटके, डॉ. सतीश काळे, डॉ. स्वाती काळे, डॉ. संतोष गिऱ्हे, पारगावचे सरपंच वैभव बोठे, अमोल खेडकर, प्रा. गोरख अमृत, शरदराव हिंगे, भिल्ल संघटनेचे अध्यक्ष अनिल बर्डे, रमेश नवगिरे, उषा काळे, वृषाली उमाप, गौरी नेटके, कलाबाई नेटके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सुनील उमाप म्हणाले की, सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे.

स्पर्धेच्या युगात युवक ताणतणाव व निराशेमुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. कमी वयातच व्यसनाधिन झालेले युवक दिसत असून, व्यसनापासून युवकांना दूर करण्यासाठी जनजागृतीद्वारे मानसिकता बदलण्याची गरज आहे. काळजापार संस्थेने व्यसनमुक्तीसाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.संस्थेच्या अध्यक्षा कविता नेटके म्हणाल्या की, एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला व्यसन लागल्यास त्यांचे संसार उघड्यावर येते. व्यसनामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत असताना वाढते व्यसनाचे प्रमाण रोखण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेचे संस्थापक बाळासाहेब नेटके यांनी तंबाखू व धुम्रपान करणार्या युवकांची संख्या अधिक आहे. फॅशन म्हणून युवक-युवती व्यसन करताना दिसत आहे. नशेच्या आहारी जाऊन युवा वर्ग आपले जीवन उध्वस्त करीत आहे. व्यसन फक्त श्रीमंत वर्गा पुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तरुण देखील यामध्ये ओढला गेला आहे. हे व्यसनमुक्ती केंद्र एक चळवळीच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ४४ अभियंत्यांची जपानच्या कंपनीत निवड

Next Post

विखुरलेल्या अल्पसंख्यांक समाजात धर्मांध शक्ती दशहत निर्माण करत आहे – सुशांत म्हस्के

Admin

Admin

Next Post
विखुरलेल्या अल्पसंख्यांक समाजात धर्मांध शक्ती दशहत निर्माण करत आहे – सुशांत म्हस्के

विखुरलेल्या अल्पसंख्यांक समाजात धर्मांध शक्ती दशहत निर्माण करत आहे - सुशांत म्हस्के

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group