जळगाव, 12 मार्च (हिं.स.) धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ व्यक्तींना १२ मार्चपासून १५ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी हा आदेश जारी केला आहे. रामानंद नगर पोलिस ठाण्याने या १४ व्यक्तींविरोधात अहवाल तयार करून हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी गोसावी यांच्याकडे पाठवला होता. धुलिवंदनाच्या सणादरम्यान संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हद्दपारीच्या कालावधीत हे व्यक्ती शहरात आढळल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हद्दपार व्यक्तींची यादी:
1. राकेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा)
2. किरण अशोक सपकाळे (हुडको, पिंप्राळा)
3. सचिन अभयसिंग चव्हाण (गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा)
4. जय राजेंद्र सैंदाणे (समतानगर)
5. दानिश बाशीत पिंजारी (खंडेरावनगर)
6. झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (राजीव गांधीनगर)
7. समीर सलीम शेख (आझादनगर)
8. राम उर्फ बारकू संतोष भोई (खंडेरावनगर)
9. लखन संतोष भोई (खंडेरावनगर)
10. सागर कपील भोई (खंडेरावनगर)
11. दत्तू विश्वनाथ कोळी (म्युन्सिपल कॉलनी)
12. अक्षय उर्फ गंम्प्या नारायण राठोड (पिंप्राळा)
13. नितेश मिलिंद जाधव (मढी चौक)
14. इच्छाराम पुंडलिक वाघोदे (समतानगर)
प्रशासनाची सतर्कता:
होळी आणि धुलिवंदन सणादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. संभाव्य गडबड करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई केली जात आहे. नागरिकांनी सणाचा आनंद घेताना शिस्त व शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.