Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर नगरपंचायत करतेय अजब कारभार ,  मुख्य रस्ते करतेय साफ, तर गल्ली बोळात मात्र घाणीच्या साम्राज्याचा होतोय ताप !

Admin by Admin
July 25, 2024
in मुक्ताई वार्ता
0
मुक्ताईनगर नगरपंचायत करतेय अजब कारभार ,   मुख्य रस्ते करतेय साफ, तर गल्ली बोळात मात्र घाणीच्या साम्राज्याचा होतोय ताप !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर नगरपंचायत करतेय अजब कारभार ,

मुख्य रस्ते करतेय साफ, तर गल्ली बोळात मात्र घाणीच्या साम्राज्याचा होतोय ताप !
मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील हायवे उड्डाण पूल ते बुऱ्हानपुर रोड हिंदू स्मशानभूमी व प्रवर्तन चौक ते तालुका क्रीडांगण अशा मुख्य रस्त्यावर  स्वच्छतेवर भर देवून काम करतेय यात रातोरात झाडू मारून कचरा उचलून शहर किती चांगले स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.हे भासविण्याचा प्रयत्न करून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रयत्न करीत आहे.
कारण हे दोन्ही रस्ते म्हणजेच नवीन मुक्ताई मंदिर ते बुऱ्हाणपूर रोडवरील हिंदू स्मशान भूमी पर्यंत चा रस्ता इंदौर – छत्रपती संभाजी नगर महामार्ग असून हा रस्ता MSRDC विभागाच्या ताब्यात आहे. तर प्रवर्तन चौक ते तालुका क्रीडांगण पर्यंत असलेला भुसावळ रोड हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग , मुक्ताईनगर च्या ताब्यात आहे. त्यामुळे या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता ही सर्व जबाबदारी त्या त्या विभागाची आहे . आणि त्या रस्त्यांवर  तसे मेन्टनंस बिले सुद्धा संबंधित विभाग काढत असतात.
मग त्याच रस्त्यांवर नगर पंचायत प्रशासन स्वच्छ भारत मिशन राबवून येथे लाखो रुपये बिले संबंधीत ठेकेदाराला अदा कशी करू शकते ? हा मुळात प्रश्न उद्भवतो.
तर दुसरीकडे शहरातील नागरिकांकडून स्वच्छ भारत मिशन साठी वेगळा कर आकारून सुविधा मात्र दुसरीकडे देण्यावर भर का देत आहे.
तसे पाहता प्रत्येक गल्लीत झाडू मारणे, रस्त्यावर साचनारा कचरा संकलन करणे , गटारी तील निघालेला घण कचरा उचलणे  आदी मागणी नागरिकांनी केल्या असता संबंधित नगरपंचायतीचे अधिकारी माणसांची कमतरता असल्याचे उत्तरे नागरिकांना देतात.तर ठेकेदारांची देखील उत्तरे चकरात टाकणारी असून  स्वच्छ भारत मिशन वर खर्च होणारी लाखो रुपयांची देयके केवळ ठेकेदार आणि काही लोकांचे खिसे भरण्याचे काम करीत आहे का ?
नागरिकांकडून वसूल होणाऱ्या करा (Tax) पोटी त्यांना योग्य त्या सुविधा नगरपंचायत प्रशासन पुरवणार का ? प्रत्येक प्रभागातील गल्लीत रस्त्यांवर स्वच्छता अभियान प्रत्यक्षात दिसून येणार का ? असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktai nagarMuktai vartaMuktai varta newsMuktainagar Newsमुक्ताई वार्तामुक्ताईनगरस्वच्छ भारत मिशन
Previous Post

आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भाड्यांचा संच वाटप !

Next Post

आमदार चंद्रकांत पाटलांनी जिल्हा नियोजनला धरले धारेवर, बोदवड तहसिल कार्यालयात 07 तलाठ्यांची नियुक्ती …!

Admin

Admin

Next Post
आमदार चंद्रकांत पाटलांनी जिल्हा नियोजनला धरले धारेवर, बोदवड तहसिल कार्यालयात 07 तलाठ्यांची नियुक्ती …!

आमदार चंद्रकांत पाटलांनी जिल्हा नियोजनला धरले धारेवर, बोदवड तहसिल कार्यालयात 07 तलाठ्यांची नियुक्ती ...!

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group