Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

*महाराष्ट्र सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टचा अंतरीम निकाल/महत्वाचे मुद्दे:*

Admin by Admin
May 11, 2023
in मुक्ताई वार्ता, राजकीय
0
*महाराष्ट्र सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टचा अंतरीम निकाल/महत्वाचे मुद्दे:*
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*महाराष्ट्र सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टचा अंतरीम निकाल/महत्वाचे मुद्दे:*
👇👇👇

आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्तनेवमहत्वाच्या टिप्पण्या करून निकाल दिला असून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जरी ४ महत्त्वाचे निर्णय लागले असले तरी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा सत्तेत आणता आले असते अशी महत्त्व पूर्ण टिप्पणी जोडत महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणविस सरकार कायम राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला असून 16 आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करण्याच्या चेंडू देखील विधान सभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.

पहा कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण , निकाल व मुद्दे

*१) महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडवीस सरकारच कायम सुप्रीम कोर्टाचा निर्णय.*
*२) उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळेच भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा राज्यपालांना निर्णय योग्य ठरतो.*
*३) आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयात हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. आम्ही 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेणार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा. मात्र सुप्रीम कोर्ट कडून अंतिम वेळ (डेडलाईन) देण्यात आली नाही.*
*४) उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून दिलेला राजीनामा परत मागे घेऊ शकत नाही. कारण उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांचा राजीनामा सादर केला होता.*
*५) खरी शिवसेना कोणती? ह्याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा.*
*६) राज्यपालांनी राज्यघटनेतील अधिकारांच्या आत राहूनच निर्णय घ्यायला हवे.*
*७) अपात्रतेसंदर्भातली नोटीस बजावलेली असतानाही कोणताही आमदार सभागृहाच्या कामकाजाच सहभागी होऊ शकतो. त्यामुळे सभागृहात झालेल्या कामकाजाची वैधता आमदारांच्या अपात्रतेबाबत होणाऱ्या निर्णयावर अवलंबून असू शकत नाही.*
*८) विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.*
*९) शिंदे गटाकडून भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नेमणूक बेकायदेशीर.*
*१०) व्हीप फक्त राजकीय पक्षच देऊ शकतो.*
*११) नबम रेबिया प्रकरणातील तरतुदी इथे लागू होतात की नाही याचा निर्णय 7 सदस्यीय मोठ्या खंडपीठासमोर होईल.*

Tags: Jalgaon NewsLatest Marathi News
Previous Post

मुक्ताईनगर नगरपंचायतीचे लेखापालांचे व्यवस्थापनाने 94 लाखांचा नफा,आमदारांनी केला सत्कार

Next Post

संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यासाठी उद्या 12 मे शुक्रवार रोजी होणार  श्री.पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर हुन मुक्ताईनगर कडे प्रस्थान 

Admin

Admin

Next Post
संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यासाठी उद्या 12 मे शुक्रवार रोजी होणार  श्री.पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर हुन मुक्ताईनगर कडे प्रस्थान 

संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यासाठी उद्या 12 मे शुक्रवार रोजी होणार  श्री.पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर हुन मुक्ताईनगर कडे प्रस्थान 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group